पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…

इमेज
गांधी आणि इंग्रजी सिनेमा रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी १९८२ साली गांधींच्या जीवनावर सिनेमा काढला. त्याला एकूण आठ ऑस्कर मिळाले. हा सिनेमा जगभर गाजला. हॉलिवुड आणि परकीय भाषेत पुढे गांधींचा विचार सतत दिसला. २००७ साली ‘द ग्रेट डिबेटर्स’ हा डेंझिल वॉशिंग्टन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आला. त्याचा काळ १९३५चा आहे. याची कथा सत्यघटनेवर आधारलेली आहे. अमेरिकेतील टेक्ससमध्ये वायली या नावाचे निग्रो मुलांचे एक छोटे महाविद्यालय असते. तिथं एक नवीन शिक्षक येतात आणि विद्यार्थ्यांची ‘डिबेट टीम’ तयार करतात. ही टीम स्पर्धेत उतरते, एकेक टप्पा पार करत अंतिम सामन्यात पोचते. अमेरिकेत निग्रो विद्यार्थ्यांची पहिलीच टीम अंतिम सामन्यात पोचते. तिथे सामना होतो हार्वर्ड विद्यापीठाच्या (गोऱ्या) विद्यार्थ्यांसोबत. अंतिम डिबेट सुरू होते. ही डिबेट ‘हिंसा विरुद्ध अहिंसा, सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता, कायदा विरुद्ध सविनय कायदेभंग’ अशी बनते. निग्रो विद्यार्थी अहिंसा, असहकार, सहिष्णुतेच्या बाजूने असतात; तर गोरे विद्यार्थी कायदा, सुव्यवस्था आणि कायद्याचा अंमल राखण्यासाठी हिंसा गरजेची असते, म्हणजेच अनागोंदी होऊ नये,...